हवं असतं कुणीतरी
ऐकेल जो काहीतरी !
उंचावतील भुवया
पण पचवेल कसंतरी !!
नको नुसतंच नातं
दळायला पिठाचं जातं !
दिसभर गाणं दळायचं
संवादाचं कारण फक्त !!
बोलावसं वाटलं पाहिजे
अश्रू अलवार निखळले पाहिजे !
भिजला जरी जरीचा खांदा
धीराच्या ऊबेन वाळवला पाहिजे !!
सगळाच नवखा पसारा
बाळाला कसा कुणी आवरा !
जिंकले नक्कीच गड जातील
प्रवासात थोडं कुणी सावरा !!
आज नको तक्रार
आणिक कुठलाच वार
फक्त वाहूदे मळभ
ऐकायला कान चार !!
No comments:
Post a Comment